रायपुर – छत्तीसगडने विकासात मोठी झेप घेतली असून आमच्या विकास मॉडेलची देशभर चर्चा सुरू झाली आहे. आम्ही गुजरात मॉडेलला मागे टाकले आहे असा दावा त्या राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी केला आहे.
या सरकारला सत्तेवर येऊन तीन वर्ष पुर्ण झाली आहेत त्यानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. आम्ही नवीन छत्तीसगडचे स्वप्न पाहिले आणि या मार्गावर आम्ही वेगाने वाटचाल करीत आहोत असे ते म्हणाले.
आम्ही गेली तीनवर्षे सातत्याने सर्वाधिक स्वच्छ राज्य म्हणून देशपातळीवरील पारितोषिक मिळवले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला एकूण 67 पुरस्कार यावर्षी मिळाले आहेत. अन्यही बाबतीत राज्याची कामगिरी दैदिप्यमान असून आता आमच्या विकासाच्या मॉडेलची देशभर चर्चा सुरू आहे असे त्यांनी नमूद केले.