मुंबई – वरळी गॅस स्फोट प्रकरणातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मुंबईच्या महापौरांना 72 तासांनंतर वेळ मिळाला होता, एवढा काळ त्या कोठे झोपल्या होत्या असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला होता.
दरम्यान,वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारणी आशिष शेलार म्हणाले, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे परंतु माझा आवाज कधी बंद होऊ देणार नाही असं आशिष शेलार म्हणले आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘खोटी तक्रार, गुन्हा खोटा, कायदेशीर प्रक्रिया, खोटे प्रकरण आहे. या राज्यात पोलीस बाळाचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आहे. पण बदनामी साठी सत्तेचा दुरूपयोग करून हा एफआयआर केला आहे