सोलापूर – त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या पुण्याच्या एका भक्ताने अक्कलकोटमधील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बाळासाहेब चंद्रशा गवळी (वय 49, कर्वेनगर, पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ते अक्कलकोटमध्ये आले होते. ते एसटी स्टॅंड समोरील अयोध्या लॉजवर उतरले होते. स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन लॉजवर पुन्हा परतले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांनी आतून कडी घालून रूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
गुरुवारी संध्याकाळी दरवाजा उघडत नसल्यामुळे लॉजचे मालक कमलेश परिआर यांनी पोलिसांना बोलावून दार उघडले असता बाळासाहेब गवळी यांनी आत्महत्या केल्याचे दिसले. याप्रकरणी कमलेश परिहार यांनी उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास हवालदार राजाराम फुलारी करीत आहेत.