मुंबई: त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ काल राज्यात मुस्लिम संघटनांनी विविध ठिकाणी निवेदने दिली. मात्र काही ठिकाणी याला आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या पार्श्वभुमिवर आज अमरावती बंदचे आवाहन भाजपाने केले होते. मात्र भाजपच्या या बंदच्या आवाहनला हिंसक वळण लागले. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Muslims across the state had taken out a protest march today against the violence in Tripura. During this, stone pelting was done in Nanded, Malegaon, Amaravati and some other places. I appeal to all Hindus & Muslims to maintain peace: Maharashtra HM Dilip Walse Patil pic.twitter.com/VdzCwwLeEC
— ANI (@ANI) November 12, 2021
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शांततेचे आवाहन केले आहे. “भाजपचा मोर्चा शांततेने होईल अशी अपेक्षा होती, मात्र वेगळं वळण लागलेलं आहे. पोलीस विभाग आवश्यक पावलं टाकत आहे, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी बोलत आहेत, राज्य महत्त्वाचे आहे ,सर्वांनीच सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. समाज माध्यमातून कोणी चिथावणी देत असेल तर कारवाई केली जाईल”, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.