मुंबई – राज्यात ऐन दिवाळसणाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.त्यामुळे राज्यातील जनतेचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत.दरम्यान, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे,यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलतांना गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे. आंदोलकांना साधे पिण्यासाठी पाणीही दिले जात नाही. हे महाविकास आघाडीचे सरकार हे राक्षशी प्रवृत्तीचे आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले,’ परब माध्यमांसमोर गोड बोलतात, अन् जेव्हा कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी जाते तेव्हा ते त्यांना बोलता देखील येत नाहीत. परब हे निर्णयाची कॉपी घेऊन आंदोलनस्थळी आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू’ असे परब म्हणाले आहे.