मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीने सोमवारी अनिल देशमुख यांना अटक केली होती. चौकशीदरम्यान, अनिल देशमुख यांच्याकडून कोणत्याही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली नसल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख याला चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते.
दरम्यान, वसुली प्रकरणातील आरोपी सचिन वाजे याला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाजे याला यापूर्वी 6 नोव्हेंबरपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवण्यात आले होते. आज ती कोठडी संपली. वाजे यांना पुन्हा एकदा 13 नोव्हेंबरपर्यंत मुंबई पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसुली प्रकरणात मुंबईच्या एस्प्लेनेड कोर्टाने सचिन वाजेला 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
25 फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन सापडले होते. या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाजे यांचे नाव समोर आले होते. यानंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची महाराष्ट्र सरकारने बदली करून त्यांना होमगार्डचे डीजी बनवले होते. यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना सचिन वाजे यांच्याकडे दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा दावा माजी आयुक्तांनी या पत्रात केला होता.