दुबई – भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर ताशेरे ओढले आहेत. कोहलीच्या नेतृत्वातील कमकुवत दुवे सध्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत ठळकपणे दिसून येत आहेत.
सामन्यादरम्यान सतत आरडाओरड केल्याने सामने जिंकता येत नाहीत, त्यासाठी कामगिरी सरस करावी लागते हे कोहलीला आता लक्षात यायला हवे, अशा शब्दांत गंभीरने कोहलीचे कान टोचले आहेत.
मैदानात फलंदाजी करताना किंवा क्षेत्ररक्षण करताना सतत काहीतरी बडबड करणे, वारंवार प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत राहणे व आपल्या मनासारखे घडले नाही तर सतत संताप व्यक्त करत आरडाओरड करणे ही एका समर्थ नेतृत्वाची लक्षणे नसावीत, असेही गंभीरने सांगितले आहे.