दुबई :- भारताचा आज अफगाणिस्तानविरुद्धचा होणारा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सामन्यात जर भारतीय संघ पराभूत झाला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो, असाच असणार आहे.
भारत विरूध्द अफगाणिस्तान या महत्वपूर्ण सामन्यास थोड्य़ाच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (टाॅस) हा अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आहे. (Afghanistan win the toss and elect to field against TeamIndia) अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केल आहे.
दरम्यान, टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी एक संधी मिळणार आहे. जर भारताने उर्वरित सर्व लढती मोठ्या फरकाने तसेच अव्वल रन रेट राखून जिंकल्या व अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला, तर भारतीय संघ उपांत्य फेरी गाठू शकतो. अर्थात हे दिवास्वप्नच दिसत आहे.
या स्पर्धेत भारताचे दोन सामने झाले असून, एक पाकिस्तानकडून तर दुसरा न्यूझीलंडकडून पराभवही स्वीकारावा लागला. आता या स्थितीत भारतीय संघाला स्कॉटलंड, नामिबिया व अफगाणिस्तान यांच्याशी सामना खेळायचा आहे. हे सर्व सामने जिंकले तर भारताचे सहा गुण होतील.
भारतीय संघ – आर शर्मा, केएल राहुल, व्ही कोहली, एस यादव, आर पंत, एच पांड्या, आर जडेजा, एस ठाकूर, आर अश्विन, एम शमी, जे बुमराह
अफगाणिस्तान संघ –एच झझाई, एम शहजाद, आर गुरबाज, एन झद्रान, एम नबी, जी नायब, के जनात, आर खान, एस अश्रफ, नवीन-उल-हक, एच हसन