दुबई- सार्वजनिक क्षेत्रातील इंडिया कंपनी टाटा समूहाकडे जाणार असल्याचे वृत्त चालूच आहे. मात्र आज पुन्हा केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात अद्याप औपचारिक निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
यासंदर्भात बोली मागवल्या होत्या. या बोली आल्या आहेत. नियमाप्रमाणे या बोलींचे विश्लेषण संबंधित अधिकारी करीत आहेत. त्यातून अंतिम निर्णय घेतला जाईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एअर इंडियासाठी केवळ दोनच बोली बोलल्या गेल्या होत्या. त्यामध्ये मोठी बोली टाटा सन्सने लावली असल्याची अनाधिकृत माहिती वृत्त माध्यमात फिरत आहे. याबाबत काल निर्गुंतवणूक विभागाने यासंदर्भात निर्णय मंत्रिमंडळाची समिती घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.