चंदीगड – हरियाणा येथील कर्नाल येथे काल शेतकऱ्यांवर जो अमानुष हल्ला करण्यात आला आहे तो हल्ला हरियाणा सरकार पुरस्कृत हल्ला होंता असा आरोप कॅ. अमरिंदरसिंग यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा अमानुष व निर्दयी प्रकार धक्कादायकच आहे.
शनिवारी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यात दहा शेतकरी जखमी झाले आहेत. कर्नाल येथे होणाऱ्या भाजपच्या सभेच्या ठिकाणी निदर्शने करण्यासाठी शेतकऱ्यांचा एक जथ्थ्या तिकडे निघाला असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.
तथापि शेतकऱ्यांनी महामार्ग अडवल्याने त्यांच्यावर केवळ सौम्य लाठी हल्ला करण्यात आला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हरियाणातील शेतकऱ्यांना पोलिसांकडून अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळण्याचा हा पहिलाच प्रकार नव्हता. हे सरकार सातत्याने असे अमानुष हल्ले शेतकऱ्यांवर करीत आले आहे असे कॅ. अमरिंदरसिंग यांनी म्हटले आहे.