मुंबई – सध्या जागतिक विश्वात अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यावर चर्चा आणि मत मतांतरे सुरु आहेत. त्यात काही आपले मत नोंदवित आहेत. अश्यातच अफगाणीस्तानसारख्या मुस्लीम धर्मीय देशात मुस्लीम जनताच भयभीत आहे असे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत अभिनेता कमाल खान यानं आपलं मत मांडले आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं ताबा घेतल्यानंतर अफगाणी नागरिक मोठ्या प्रमाणात पलायन करतायत. अनेक जण दुसऱ्या देशांमध्ये शरणागती आणि आसरा घेण्यासाठी धडपड करतायत. यात बहुसंख्य नागरिक हे मुस्लीम धर्माचे आहेत.
याबाबत कमाल खानने ट्विट करत लिहीलं की, ”अफगाणिस्तानातील अनेक मुस्लीम त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारतात प्रवेश करतायत, माझं म्हणणं 100% खरं ठरलं. भारत हा मुस्लीमांसाठी जगातील सर्वात सुरक्षित देश आहे.” या ट्विटसोबतच त्याने एका वृत्तपत्राचा फोटोही शेयर केला आहे. त्यात त्याने आपल्या मुलांना महत्वाचा सल्ला देत लिहीलं की, ”जगात कुठंही जा, काहीही करा, पण आपलं राष्ट्रीयत्व बदलू नका. कारण, भारत हा जगातील सर्वात चांगला देश आहे. काही भारतीय मुस्लीमांना भारतात असुरक्षित वाटतं कारण त्यांना इतर मु्स्लीम देश पाहिले नाहीत.” असं कमाल खान म्हणाला आहे.
Many Afghanistani Muslims are entering in India for their safety. So my this statement is proved 100% correct again. India is the best country for Muslims. pic.twitter.com/mgYipuReGL
— KRK (@kamaalrkhan) August 22, 2021
कमाल खान बॉलिवुडमध्ये फारसं काही करु शकला नाही तरी तो त्याच्या स्वभावामुळे आणि काही ना काही वक्तव्य करत सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतो. 2009 ला बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनमध्ये तो झळकला होता.