पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व कॉंग्रेसचा इतिहास हा एकच आहे. स्वातंत्र्याचा लढा हा लोकमान्य टिळक, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आजाद आदी थोर स्वातंत्र्य सेनानींच्या नेतृत्वाखाली लढला गेला.या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि कॉंग्रेसने दिलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येक कार्यकत्याचे कर्तव्य आहे. अशा भावना कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कॉग्रेसभवन येथे बागवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बागवे यांनी राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनापासून स्वातंत्र्या पर्यंतचा इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटूंबियांचा सन्मान ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हास पवार व शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र सैनिक सरस्वती मराठे, अन्नपूर्णा वाघ, श्री. हरिहर अनंत नाबर, मुकुंदराव नगरकर यांचे चिरंजीव संजय नगरकर, सिताबाई चोरगे यांचे चिरंजीव किशोर चोरगे, शशिकला दत्तात्रय क्षिरसागर यांचे नातू चैतन्य क्षिरसागर,नरसिंह राघवेंद्र मळगे यांची मुलगी माय मठकर व महेश्वरी पुराणिक, जगन्नाथ पाटसकर यांचे चिरंजीव प्रदीप पाटसकर व मुलगी वंदना पाटसकर, उध्दवराव इंगवले यांचे चिरंजीव भारत इंगवले, विठ्ठल भल्ला यांचे नातू आनंद खन्ना, सुवालाल व मिनाबाई यांचे चिंरजीव . अनिल कांकरिया यांना सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले की, अतिशय कठिण परिस्थितीमध्ये या स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रज सरकारला विरोध केला. रविंद्रना टगोर यांनी देशाला राष्ट्रगीत दिले. वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद चा नार देत सत्याग्रहींनी आंदोलने केली. आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत. या स्वातंत्र्य सेनानींने केलेले योगदान देश कधीही विसरू शकत नाही.
या वेळी आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, व्यर्थ न हो बलिदान या अभियानाचे समन्वयक ऍड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, नीता रजपूत, वीरेंद्र किराड, अरविंद शिंदे, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, डॉ. सतिश देसाई, नितीन परतानी, अनिल सोंडकर, द. स. पोळेकर, रमेश अय्यर, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाट, मुख्तार शेख, शिवाजी बांगर, विठ्ठल गायकवाड, चैतन्य पुरंदरे, अमीर शेख, रजनी त्रिभुवन, भारती कोंडे, सोनाली मारणे यांच्यासह कॉंग्रेसचे शहर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.