नवी दिल्ली -लष्करातील सहा अधिकारी आणि जवानांना शौर्य चक्र जाहीर झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांत गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना शांतता काळातील सर्वोच्च तिसऱ्या क्रमांकाच्या पदकाने गौरवले जाईल.
मेजर अरूणकुमार पांड्ये, मेजर रविकुमार चौधरी, कॅप्टन आशुतोष कुमार, कॅप्टन विकास खत्री, रायफलमन मुकेश कुमार आणि शिपाई नीरज अहलावत यांना शौर्य चक्र प्रदान केले जाईल. आशुतोष कुमार यांचा मरणोत्तर सन्मान होणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध पदकांची घोषणा झाली. लष्करातील इतर 116 जवानांना सेना पदकांनी गौरवले जाणार आहे.