नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने अद्याप सुवर्णपदक पटकावलेले नाही. त्यातच कुस्तीच्या सामन्यांना नुकतीच सुरुवात झाली असून, त्यात भारताचा अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्याकडून आता देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेताना त्याने गेल्या 10 पैकी 10 स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे. त्याचबरोबर जागितक कुस्ती स्पर्धेत तीन पदके पटकावणारा तो भारताचा एकमेव कुस्तीपटू ठरला आहे.
बजरंगने गेल्या 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बजरंगने 6 सुवर्ण, तीन रजत व एक ब्रॉंझपदक मिळवले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये त्याचा पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.30 वाजता होणार आहे. बजरंगने ही फेरी पार केली तर तो उपांत्य आणि अंतिम फेरीत दाखल होऊ शकतो. बजरंगच्या 65 किलो वजनाची उपांत्य आणि अंतिम फेरी शनिवारी होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता हा सामना पाहता येणार आहे. बजरंग 65 किलो वजनी गटात खेळतो.
सध्या त्याने दिवसातील दोन सत्रात सराव करण्यास सुरुवात केली आहे. तसेच येथील वातावरणाशी तसेच स्पर्धेत असलेल्या विविध कुस्तीपटूंच्या सरावाचे निरीक्षणही करताना आपल्यात काय बदल केले पाहिजेत, याचीही नोंद ठेवत सरावात त्यावर काम करण्यात मेहनत घेतली आहे.