नवी दिल्ली – देशात तिसरी लाट येण्याच्या चर्चा महिनाभरापासून सुरू आहेत. मात्र, दुसरी लाट कधी संपणार ते अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. परंतु राज्यांतील सुधारत असलेल्या स्थितीवरून आता त्याचाही अंदाज बांधला जाऊ लागला आहे.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवा राज्यांतील करोनाची लाट ओसरलेली आहे. या राज्यांमध्ये हळूहळू करोना रुग्णांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे.
उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्येदेखील करोना रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. यानुसार पंजाबमध्ये 22 मे तर हिमाचल प्रदेशमध्ये 24 मे रोजी सर्वाधिक करोना रुग्णांची संख्या नोंदवली जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय देशभरात मे महिन्याच्या अखेरपर्यंत करोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसेल, असाही अंदाज वर्तवण्यात आलाय, तर जुलैच्या अखेरपर्यंत करोनाची दुसरी लाट देशभरातून संपेल, असे सांगण्यात येत आहे.