मुंबई – मुंबईतील भांडुप उपनगरात एका मॉलमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या बारा रुग्णांचा मध्यरात्री अचानक लागलेल्या होरपळून मृत्यू झाला. यामुळे रुग्णालय आणि मॉलमधील अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यावरून आता भाजप महाराष्ट्राने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
भाजप महाराष्ट्राने ट्विटरवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले कि, भंडारा ते भांडुप… राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता विचार केला, तरी अशा धोकादायक रुग्णालयांची संख्या तब्बल ७६२ आहे… महापालिकेच्याच फायर ऑडिटमधली ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का ठाकरे सरकार…, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
भंडारा ते भांडुप… राज्यात सगळीकडेच रुग्णालयांना आगीचा धोका आहे. फक्त मुंबईपुरता विचार केला, तरी अशा धोकादायक रुग्णालयांची संख्या तब्बल ७६२ आहे… महापालिकेच्याच फायर ऑडिटमधली ही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का ठाकरे सरकार…? pic.twitter.com/UGMyRBEnCd
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
तसेच, भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं, असा टोलाही भाजपने ठाकरे सरकारला लगावला आहे.
भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १५६ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी ४३ कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे १२ निष्पाप बळी गेले.
भंडारा दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी १५६ रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसाठी ४३ कोटींच्या प्रस्तावाचा आदेश दिला होता. मात्र अनेक घोषणांप्रमाणे हा प्रस्तावही दुर्लक्षितच राहिला. आता पुन्हा झालेल्या अग्नितांडवात ठाकरे सरकारच्या हलगर्जीमुळे १२ निष्पाप बळी गेले. @OfficeofUT pic.twitter.com/MuR6wwNhio
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
अग्निसुरक्षेसाठी १२० दिवसांची मुदत दिली असतानाही २१९ खाजगी, ३ सरकारी आणि २८ पालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या नाहीत. पालिकेनेही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. मग आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी कारवाई का केली नाही, असा सवालही भाजप महाराष्ट्राने केला आहे.
अग्निसुरक्षेसाठी १२० दिवसांची मुदत दिली असतानाही २१९ खाजगी, ३ सरकारी आणि २८ पालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या नाहीत. पालिकेनेही जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. मग आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर @OfficeofUT यांनी कारवाई का केली नाही? pic.twitter.com/gSFUFD84UP
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
दरम्यान, मुंबईतील भांडुप उपनगरात एका मॉलमध्ये असलेल्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेणाऱ्या आठ रुग्णांचा मध्यरात्री अचानक लागलेल्या होरपळून मृत्यू झाला. मात्र, अन्य 70 जणांना तेथून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. करोनामुळे मरण पावलेल्या दोघांचे मृतदेहही आढळले आहेत. या आठ जणांचा आगीत भाजल्याने आणि धुरामुुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.