मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं. रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. यावरून आता केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकार आमने-सामने आले आहे.
सेलिब्रिटींच्या ट्वीट ची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर!
‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असच बोलावं वागावं व लिहावं.फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचुन घ्यावा.— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 9, 2021
यातच मोदी सरकार या कलाकारांवर दबाब टाकत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. यावरून सध्या देशात नवा वाद पेटला असून सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करत सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, असे म्हटले आहे
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी
सेलिब्रिटींच्या ट्वीट ची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर!
‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असच बोलावं वागावं व लिहावं.फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचुन घ्यावा.