नवी दिल्ली – उत्तरप्रदेशमध्ये विकृतीचा कळस गाठणारी आणि निर्भयाची पुनरावृत्ती झाल्याची घटना समोर आल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींनी या महिलेचे अक्षरश: लचके तोडले. यावर महिला आयोगाच्या सदस्येने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.
महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर त्या म्हणाल्या कि, मी विचार करते कि पीडिता रात्री तेथे गेली नसती अथवा तिने आपल्या मुलांना सोबत नेले असते तर घटना टाळता आली असती. परंतु, हे दुष्कृत्य सुनियोजित होते. पीडितेला फोन करून त्याठिकाणी बोलविण्यात आले होते. पीडिता गेली व हे दुष्कृत्य घडले, असे मत त्यांनी व्यक्त केले
चंद्रमुखी देवी यांचे विधान हे राष्ट्रीय महिला आयोगाचे मत नाही आणि मी त्याचा तीव्र निषेध करते, असे महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी म्हंटले आहे. रेखा शर्मा यांनी चंद्रमुखी देवी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास पाठवले होते.
रेखा शर्मा म्हणाल्या कि, चंद्रमुखी देवी यांनी असे का म्हंटले माहित नाही. परंतु, कोणतीही महिला तिच्या इच्छेनुसार कोठेही फिरू शकते. महिलांसाठी सर्व ठिकाने सुरक्षित बनवण्याची जबाबदारी सरकार आणि समाजाची आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
No I don’t..I don’t know how and why the member has said this but women have all the right move on their will whenever and wherever they want to. It’s society and state’s duty to make places safe for women. https://t.co/WlG2DWs20G
— Rekha Sharma (@sharmarekha) January 7, 2021
दरम्यान, पूजा करण्यासाठी गेलेल्या 50 वर्षीय अंगणवाडी सेविकेवर पाशवी अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या महिलेच्या शवविच्छेदनातून मन हेलावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर इजा पोहोचली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेवर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे