मुंबई- ठाणे- स्टार प्रवाहवरील मालिका आई कुठे काय करते मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला मिळत असलेला प्रतिसाद वाखणण्याजोगा आहे. प्रत्येक पात्र आपलंसं करणारं असल्याने प्रेक्षकांमध्येही मालिकेची चर्चा चांगलीच रंगत असल्याचंं चित्र आहे.
याच मालिकेतच्या मागील भागात अनिरुद्ध वैतागुन घर सोडून संजनाकडे निघून जातो. त्या घरात प्रचंड वाद होतो. अनिरुद्धचे बाबा त्याला घर सोडण्याची परवानगी देतात. अनिरुद्ध संजनाकडे निघून जातो. संजना आणि अनिरुद्ध आपल्या जोडीदारांना घटस्फोट देण्याचा विचार करतात. त्यासाठी वकिल शोधतात.
नाश्त्याच्या वेळी ब्रेडबटर दिसल्यावर अनिरुद्धला लगेच घरची आठवण येते. त्यामुळे तो संजनाला नाश्त्याला नकार देत. लॅपटॉप विसरलो सांगून घराकडे धाव घेतो. त्यामुळे अनिरुद्धला या सगळ्याचा आयुष्यात एकदातरी पश्शात्ताप होईल, असं बहिण विशाखा सांगते.
दरम्यान, दिवाळीच्या सणात अनिरुद्ध घरी नसल्याने आईला रुख रुख वाटते आहे. मात्र आपला मुलगाच चुकला हे आईला विसरुन चालणार नाही याची आठवण बाबा सतत आईला करुन देताना दिसत आहे. अनिरुद्धला घर सोडल्याचा खरंच पश्शात्ताप होईल का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.