मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असून हे प्रमाण 92.49 टक्के एवढे झाले आहे. आज 3 हजार 001 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 18 हजार 380 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 2 हजार 535 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 84 हजार 386 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 49 हजार 777 झाली आहे.
राज्यात आज 60 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 % एवढा आहे. सध्या राज्यात 7 लाख 48 हजार 226 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 5 हजार 395 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.