RBI 90th Anniversary| रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBIला आज 90 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे नाणे जारी केलं.
देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी केले आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. RBIच्या स्थापनेला आज 90 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हे 90 रुपयांच्या नाण्याचे खास गिफ्ट देण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai | PM Modi releases a commemorative coin on the 90th anniversary of the Reserve Bank of India pic.twitter.com/C2tja3tKWn
— ANI (@ANI) April 1, 2024
90 रुपयांच्या नाण्याचं वैशिष्ट्य
90 रुपयांच्या नाण्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिलेलं आहे. नाण्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि वरच्या बाजूला हिंदीमध्ये तर खाली इंग्रजीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लिहिलेले आहे. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेलं आहे. भारत सरकारच्या टांकसाळीत बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे. विशेष म्हमजे हे नाणं 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनलेलं आहे
किती रुपयांना मिळणार नाणं?
मिळालेल्या माहितीनुसार या नाण्याची अंदाजे किंमत 5200 ते 5500 रुपये असण्याची शक्यता आहे. देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसह नाणे संग्राहकांमध्ये या नाण्याबाबत प्रचंड उत्साह आहे. 19 मार्च 2024 रोजी आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूंन कौतुक
आरबीआयच्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आरबीआयची भूमिका खूप महत्त्वाची आणि मोठी आहे. आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक समावेशनाचे फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 1935 साली स्थापना
भारताची सेंट्रल बँक RBI ची स्थापना 1935 साली झाली. 1 एप्रिल 1935 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कामकाज सुरू झाले. ही सेंट्रल बँक भारतात चलन जारी करणे, चलनविषयक धोरण तयार करणे, परकीय चलन व्यवस्थापित करणे आणि बँकांना बँकिंग सेवा प्रदान करणे यासारख्या कार्यांसाठी जबाबदारी घेते. स्थापनेच्या वेळी त्याचे कार्यालय कोलकाता येथे होते. 1937 मध्ये ते मुंबईला हलवण्यात आले.
हेही वाचा: