नवी दिल्ली – केंद्र सरकारने उसाच्या मळीवर 50 टक्के निर्यातशुल्क लावलं आहे. येत्या गुरुवारपासून म्हणजेच 18 जानेवारीपासून हा आदेश लागू होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
उसाच्या मळीचा वापर मद्यार्क उत्पादनासाठी होतो. मळीची देशांतर्गत उपलब्धता वाढवणं आणि पेट्रोलमधे इथेनॉल मिश्रणासाठीचं उद्दिष्ट गाठणं या हेतूने हा निर्णय सरकारने घेतला आहे.
खाद्यतेलांच्या आयातशुल्कातल्या सवलतीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. ही सवलत आता 31 मार्च 2025 पर्यंत लागू राहील. सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरच्या आयात शुल्कात कपात करुन ते साडेबारा टक्के करण्यात आलं होतं. यामुळं ग्राहकांना खाद्यतेल किफायतशीर दरात उपलब्ध होईल असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.