भारत हे समाजवादी धर्मनिरपेक्ष असल्याचे घटनेत नमूद करावे
कलकत्ता, दि. 22 – घटनेत दुरुस्त्या सुचविण्यासाठी स्वर्णसिंग समितीने असे सुचविले आहे, की भारताला सार्वभौम लोकशाही धर्मनिरपेक्ष समाजवादी प्रजासत्ताक असे म्हटले जावे. (सध्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असे संबोधिण्यात येते) न्यायालयीन छाननीचे उच्च न्यायालयांचे काही अधिकार कायम राहावेत. सामाजिक कायदे करताना घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे ही मूलभूत हक्कांपेक्षा महत्त्वाची मानली जावीत, परंतु त्याचा परिणाम अल्पसंख्याकांच्या खास हक्कांवर होऊ नये.
विशिष्ट भागापुरती आणीबाणीही शक्य
नवी दिल्ली – स्वर्णसिंग समितीने केलेली एक शिफारस जर मान्य करण्यात आली तर राष्ट्रपतींना देशाच्या कोणत्याही भागात आणीबाणी जारी करण्याचा अधिकार प्राप्त होईल. सध्या आणीबाणी जारी करावयाची झाल्यास ती सबंध देशात करावी लागते. समितीने अशीही शिफारस केली आहे, की जेथे आणीबाणी जारी केली आहे, अशा कोणत्याही भागातून ती उठविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असावा.
भारतासारख्या प्रचंड देशात जेथे प्रादेक्षिक विषमता आहे- संसदीय पद्धतीनेच सर्वाधिक एकता व अखंडत्व राखले जाऊ शकते.