PM Modi on Arvind Kejriwal । देशातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एका विधानाने एकच खळबळ उडालीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेसंदर्भात पंतप्रधानांनी मोठे विधान केले आहे. याविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्ही त्यांना कारागृहात पाठवलेलं नाही, न्यायालयानं दोन्ही मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवलंय” असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात हे विधान केले आहे. त्यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना झारखंड आणि दिल्लीच्या दोन विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक का करण्यात आली? असा थेट सवाल पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी,”आम्ही त्यांना तुरुंगात पाठवलेलं नाही. न्यायालयानं दोन्ही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवलंय. ना आम्ही कोणाला तुरुंगात पाठवतो, ना माझ्याकडे कोणाला तुरुंगात पाठवण्याचा अधिकार आहे. आमच्याकडे अधिकार नाही. कुणालाही तुरुंगात पाठवण्याचा न्यायालयाला अधिकार आहे.”असं त्यांनी म्हटले.
पंतप्रधानांकडून कोर्टाच्या टिप्पणीचा आधारPM Modi on Arvind Kejriwal ।
रजत शर्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? माजी मंत्री मनीष सिसोदिया यांच्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालय काय म्हणाले? हे सर्वांना माहीत आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केलेलीही लोकांनी पाहिली आहे.”
दिल्ली दारू घोटाळ्यावर काय म्हणाले मोदी? PM Modi on Arvind Kejriwal ।
शाळांजवळ दारूची दुकाने उघडून मुलांचे आयुष्य खराब करायचंय का, असं म्हणत मोदींनी दिल्लीतील मद्य घोटाळ्याच्या मुद्द्यावर आम आदमी पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला. कमिशन मिळत असल्यानं विकल्या गेलेल्या प्रत्येक बाटलीमागे वाईनची मोफत बाटली देऊ केली. 2014 च्या निवडणुकीत मी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंच जिंकलो, हे मी स्पष्ट करतो. माझं सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी काम करतंय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.