Varanasi Lok Sabha Seat । पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. देशातील सर्व लोकसभा जागांच्या तुलनेत वाराणसीमधून पंतप्रधान मोदींना सर्वात मोठा विजय मिळवून देण्यासाठी भाजपने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदींनी लिहिलेले पत्र वाराणसीतील 2000 घरांपर्यंत पोहचवण्यात येतंय. ज्यामध्ये मतदारांना 1 जून रोजी मतदान करण्याचे आणि भाजपच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन करण्यात आलंय. प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत ५०० हून अधिक घरांना हे विशेष पत्र पाठवण्यात आले आहे.
काशीच्या जनतेसाठी खास संदेश Varanasi Lok Sabha Seat ।
पंतप्रधानाचे हे पत्र वाटपाची जबाबदारी बीएचयूचे प्रा. ज्ञान प्रकाश मिश्रा पार पाडत आहेत. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ‘पंतप्रधान मोदींकडून काशीच्या जनतेला एक विशेष पत्र पाठवलं जातंय. ज्यामध्ये हे पत्र वाराणसीच्या 2000 वेगवेगळ्या घरांमध्ये पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत हे पत्र 500 हून अधिक घरांमध्ये पाठवण्यात आले आहे. ज्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते स्वतः लोकांच्या घरी जाऊन त्यांना हे पत्र देत आहेत.
या पत्रात लिहिलेला मुख्य संदेश आहे. त्यात “१ जूनपर्यंत तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि संस्थेच्या लोकांना बूथवर आणा. प्रत्येक मत भाजपच्या बाजूने असले पाहिजे. बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने मी जे काही करू शकलो, खूप काही करायचे बाकी आहे. 2024 ची ही निवडणूक अनेक अर्थाने खास आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी काशीच्या खासदार आणि मुलाच्या रूपाने काशीच्या जनतेकडून पाठिंबा मागितला आहे.”
कला, साहित्य आणि राजकीय जगतातील लोकांना पत्रे Varanasi Lok Sabha Seat ।
आत्तापर्यंत वाराणसीतील 500 हून अधिक घरांमध्ये पंतप्रधान मोदींचा हा खास संदेश पाठवण्यात आलाय. काशीतील विविध क्षेत्रांत साहित्य, कला, राजकारण, क्रीडा, प्रसिद्ध व्यक्तींच्या घरी भाजपचे कार्यकर्ते हा संदेश घेऊन पोहोचत आहेत. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी काशीतील जनतेला दिलेला हा संदेश नक्कीच अनोखा मानला जात आहे. पत्र मिळाल्यानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींनीही पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.