संरक्षण स्वयंपूर्ण नसेल तर देशास फार मोठा धोका
पुणे, दि. 28 – आपले संरक्षण स्वयंपूर्ण नसेल तर देशाला फार मोठा धोका पोहोचेल असा इशारा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी दिला. गेली चार वर्षे संरक्षण सल्लागार समितीचा सदस्य होतो त्यामुळे संरक्षण प्रश्नविषयक जवळून अभ्यास करण्याचा योग आला.
देशात संरक्षणविषयक 31 कारखाने असून उत्पादन विभागाचे 9 कारखाने आहेत; त्यात महाराष्ट्रात 14 आहे. आपण औद्योगिक वाढीचे तत्त्व लक्षात घेऊन स्वयंपूर्ण बनण्याचा निर्धार केला पाहिजे, असेही गाडगीळ म्हणाले.
हौशी कलाकारांनी फक्त अनुकरण करू नये
पुणे – हौशी रंगभूमीवरील कलाकारांनी अनुकरण वा अंधानुकरण न करता स्वतःच्या कल्पनेचा पुरस्कार करावा, असे उद्गार भालचंद्र पेंढारकर यांनी काढले.
सामाजिक समता तातडीने आणण्याची गरज
पुणे – देशात आर्थिक आणि सामाजिक समता जमेल तशी नाही तर तातडीने आताच आणण्याची गरज आहे. हा समतेचा कार्यक्रम राबवू पाहणाऱ्या नेतृत्वाला विरोध करणाऱ्यांस मोडून काढण्याशिवाय मार्ग नाही, अशी भूमिका यशवंतराव चव्हाण यांनी मांडली.