महाजन निवाड्यानुसारच सीमाप्रश्न सुटेल
पुणे, दि. 21 – कर्नाटक-महाराष्ट्र यांच्यामधील सीमावाद केवळ महाजन निवाड्यानुसार सुटेल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री देवराज अरस यांनी आज पुन्हा एकवार जाहीर केले. मुख्यमंत्री अरस दिल्लीहून येथे आले.
महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील सीमावाद उभयपक्षी समझोता होऊन सुटेल का? या प्रश्नास उत्तर देताना अरस यांनी वरील मत मोडले. उभय राज्यांमध्ये गोदावरी पाणी वाटप प्रश्न करार होऊ सुटला. महाष्ट्राला लवकर तोडगा काढायचा असेल तर त्यांनीच यावर उपाय शोधला पाहिजे.
“जगबुडी’ ही प्राचीन भारतीय कल्पना
चंदिगड – “जलप्रलय’ अथवा जगाचा काही प्रमाणात नाश अथवा “जगबुडी’ या कल्पना इजिप्त व इतर देशातील नागरिकांनी प्राचीन भारतीय हस्तलिखितावरून उचलल्या असा दावा डॉ. मोहनसिंग यांनी केला आहे. वेदामध्ये विष्णूने मत्स्य अवतार घेतल्याचा उल्लेख असून त्यात प्रलयाचा संदर्भ आहे.
तंत्रज्ञानासाठी अणुशक्तीचा वापर
डाक्का – प्रगतशील राष्ट्रांची आर्थिकवाढ होण्यासाठी अणुशक्तीची सुधारणा व वापर तंत्रज्ञानासाठी करावा, असे मत बांगलादेशाने व्हिएन्ना बैठकीत मांडले.