नवी दिल्ली : केंद्र सरकारने करोना आपत्तीच्या काळात देशातील सुमारे 16 कोटी लोकांच्या खात्यांवर 36 हजार 659 कोटी रूपयांची रोख रक्कम थेट पोहचवली आहे अशी माहिती अर्थमंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली. 24 मार्च ते 17 एप्रिल या अवधीतील हे मदत वाटप आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना करण्यात आलेले हे वाटप आहे. यातील निधीबाबत वर्गीकरण देताना अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की यातील 27 हजार 442 कोटी केंद्र सरकारतर्फे वितरीत करण्यात आले असून 9717 कोटी रूपये विविध राज्य सरकारांमार्फत वितरीत करण्यात आले आहेत. यात पीएम किसान, मनरेगा, राष्ट्रीय सामाजिक सहाय कार्यक्रम, मातृवंदना योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, स्कॉलशिप या योजनांतील लाभार्थ्यांना करण्यात आलेले हे मदत वाटप आहे.