मुंबई – मुंबई शहर आणि आसपासच्या भागात मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या सुमारे 2 हजार 700 जणांकडून एकूण 27 लाख 48 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेत गेल्या 9 एप्रिलपासून नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात पोलीस व महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांना समज किंवा इशारे देऊन सोडून दिले.
त्यानंतर मात्र यात हलगर्जीपणा करणाऱ्यांकडून एक हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. अंधेरी, कांदीवली भागातून सर्वाधिक दंड वसुली करण्यात आली.
मे महिन्यापासून अधिक सक्तीने मास्क विषयी कारवाई सुरू करण्यात आली. एकट्या मे महिन्यातच मुंबईत 9 लाख 45 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.