नवी दिल्ली – भारतातील करोनाग्रस्तांच्या संख्येने आज 39 लाखांचा आकडा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 83 हजार 341 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
तथापि रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून आत्तापर्यंत 30 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 77.15 इतका झाला आहे.
आरोग्यमंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या आता 39 लाख 36 हजार 747 इतकी झाली आहे. तर करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या 68 हजार 472 इतकी झाली आहे.
ही आकडेवारी पहाता देशातील करोनाचा धोका कमी होण्याऐवजी तो वाढतानाच दिसून येत आहे. आता देशाच्या ग्रामीण भागातही या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे.