नवीदिल्ली – आपल्या देशातील अनेक मंदिरांना पौराणिक इतिहास आहे. म्हणूनच अशी मंदिरे पाहणायसाठी भक्त देश विदेशातून भारतात येतात. त्यातीलच एक मंदिर म्हणजे निळकंठेश्वर मंदिर. भगवान शंकराचे हे मंदिर उत्तर प्रदेशातील कालिजर किल्ल्यात आहे.येथे स्थापित केलेली मूर्ती ही शिवपुराणात समुद्रमंथनाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. या मंदिराचा इतिहास समुद्र मंथनाशी जोडलेला आहे.
देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन करण्याचा करार झाला होता. त्यावेळी नवरत्ने बाहेर आली होती. सगळ्यात आधी हलाहल विष बाहेर आले. भगवान शंकरांनी ते प्राशन केले होते. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, परंतु विष प्राशन केल्याने भगवान शिवाला खूप उष्ण वाटू लागले.त्यानंतर कालिंजर येथे आल्यावरच भगवान शंकरांना शीतलता प्राप्त झाली होती अशी आख्यायिका आहे.शिव शंकरांचा येथे वास असल्याचे आजही भक्त मानतात.
सत्ययुगात हे मंदिर सोन्याचे होते. आजही ते सुवर्णमंदिर या मंदिराखाली गाडले गेलेले आहे असा अनेकांचा समज आहे. विष प्राशन केल्यानंतर भगवान शंकरांनी बराच काळ येथे निवास केला होता. आज या मंदिराला भेट देण्यासाठी सरकारने प्रति व्यक्ती २५ रुपये कर लावला आहे.
भगवान नीलकंठेश्वर बाबांच्या दर्शनासाठी आणि जल अर्पण करण्यासाठी 25 रुपये कर भरावा लागेल. मग तुम्ही पूजा करू शकता. बुंदेलखंडमधील स्थानिक रहिवाश्यांनी अनेकदा सरकारकडे हा कर बंद करण्याची देखील मागणी केली आहे.