मुंबई : राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसभरात 22 ने वाढली असून त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या 203वर पोहोचली आहे. नव्या बाधितांमध्ये मुंबईतील सहा, पूण्यात एक, नागपुरात 3, अहमदनगर 2, सांगली, बुलढाणा आणि जळगावात प्रत्येकी एका नव्या बाधिताचा समावेश आहे.
राज्यातील बाधितांची संख्या 203वर पोहोचली असताना कोरोना पासून पूर्णत: मुक्त झालेल्या 34 बाधितांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. म्हणजे प्रत्यक्षात बाधितांची संख्या 155 आहे. या बऱ्या झालेल्या आणि घरी सोडण्यात आलेल्यांना 14 दिवस घरात विलगीकरणात राहणायाचे आदेश देण्यात आले आहेत.
आज राज्यात 34 बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात मुंबईतील 14, पुण्यातील 15, नागपूर आणि औरंगाबादेतील प्रत्येकी एक आणि यवतमाळमधील तीन नागरिकांचा समावेश आहे.