तर 207 जिल्हे संभाव्य “हॉटस्पॉट’
नवी दिल्ली : देशातील 170 जिल्हे हे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे “हॉटस्पॉट’ बनले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर 207 जिल्हे हे संभाव्य “हॉटस्पॉट’बनण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. देशात सामुहिक प्रादुर्भाव आतापर्यंत न झाल्याचा पुनरुच्चारही अधिकाऱ्यांनी केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण सापडले नाहीत असे ग्रीन झोन आणि रुग्ण अजिबात नोंदवले गेलेले नाहीत,अशा जिल्ह्यांचे वर्गीकरण करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अगरवाल यांनी सांगितले.
नवी दिल्ली : देशातील 170 जिल्हे हे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे “हॉटस्पॉट’ बनले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तर 207 जिल्हे हे संभाव्य “हॉटस्पॉट’बनण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. देशात सामुहिक प्रादुर्भाव आतापर्यंत न झाल्याचा पुनरुच्चारही अधिकाऱ्यांनी केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हॉटस्पॉट्सचे प्रमाण जास्त आहे, ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण सापडले नाहीत असे ग्रीन झोन आणि रुग्ण अजिबात नोंदवले गेलेले नाहीत,अशा जिल्ह्यांचे वर्गीकरण करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अगरवाल यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत किंवा जिथे “कोविड-19’ची वाढ झपाट्याने होत आहे अशा जिल्ह्यांना “हॉटस्पॉट’ असे म्हटले जाते. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी या लॉकडाऊन कालावधीचा उपयोग करून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे निर्देश राज्यांना देण्यात आले असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.
जे भाग “हॉटस्पॉट’ ठरले आहेत, तेथील सर्व मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, आरोग्य सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयांसह कॅबिनेट सचिवांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली आहे आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाय योजनांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
संसर्ग प्रवण भागात कोणत्याही मानवी हालचालींना परवानगी असणार नाही. केवळ आवश्यक सेवांशी संबंधितांनाच यातून वगळण्यात आले आहे. विशेष पथकांद्वारे नवीन रुग्णांचा शोध घेतला जाईल. या संशयितांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जातील. तर बफर झोनमध्ये सारी आणि इंफ्लूएंझाची लक्षणे दिसणाऱ्या लोकांची तपासणी केली जाईल, असेही अगरवाल यांनी सांगितले.