मुंबई : देशभरासह राज्यभरात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यातील करोनाबाधितांची संख्या सात लाखांच्याही पुढे पोहचली आहे. राज्यात करोना योद्धे समजल्या जाणाऱ्या पोलिसांनाही करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे. केवळ संसर्गचा नाहीतर करोनामुळे पोलिसांचा मृत्यू देखील होत आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यभरात आणखी १५१ पोलीस करोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
Chinese researcher arrested in US on charges of stealing trade secrets
Read @ANI Story | https://t.co/L6RF5fGI1A pic.twitter.com/06IizJLZuf
— ANI Digital (@ani_digital) August 29, 2020
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १४ हजार ७९२ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ७७२ जण, करोनामुक्त झालेले ११ हजार ८६७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १५३ जणांचा समावेश आहे. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे.
राज्यातील १४ हजार ७९२ करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ५७४ अधिकारी व १३ हजार २१८ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ७७२ पोलिसांमध्ये ३५८ अधिकारी व २ हजार ४१४ कर्मचारी आहेत. करोनामुक्त झालेल्या ११ हजार ८६७ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार २०१ व १० हजार ६६६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १५३ पोलिसांमध्ये १५ अधिकारी व १३८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.