जोरहाट (आसाम) – पश्चिम बंगाल मधील पंचायत निवडणुकीच्यावेळी झालेल्या हिंसाचारानंतर त्या राज्यातील सुमारे 150 लोकांनी आसाममध्ये आश्रय घेतला आहे अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.
ते म्हणाले की आम्ही या स्थलांतरीतांची राहण्याची, जेवणाची सोय केली असून त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवल्या आहेत. त्यांच्यासाठी सुरू करणत आलेल्या मदत शिबीरात सध्या सुमारे 133 लोक राहत आहेत.पंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला.
त्यात दहा जण ठार झाल्याचे राज्य पोलिसांचे म्हणणे आहे, तर बंगाल मधील हिंसाचारात किमान 45 लोक ठार झाल्याची माहिती भाजपने दिली आहे. बंगाल सरकारकडून मृतांचा खरा आकडा सांगितला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. कालच या निवडणुकांचा निकाल जाहींर झाले. त्यात सत्तारूढ तृणमुल कॉंग्रेसने एकतर्फी बाजी मारली आहे.