मुंबई – राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे 110 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 086 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. हा अहवाल राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार प्रसिद्ध करण्यात आला आहे.