पुणे – मागील महिन्यात सुरू झालेली किसान रेल्वेद्वारे राज्यातील विविध भागांतून उत्तर भारतात डाळींबांची वाहतूक आहे. किसान रेल्वेने वाहतूक केलेल्या एकूण नाशवंत वस्तुंमध्ये 61 टक्के वाहतूक केली असून, मागील एका महिन्यात सुमारे अकराशे टनांहून अधिक डाळींबाची वाहतूक झाली आहे.
कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने रेल्वे मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यात किसान रेल्वे सेवा सुरू केली. यामुळे नाशवंत वस्तुंची वाहतूक वेगवान आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारी होत आहे.
किसान रेल्वेद्वारे राज्यातून डाळींब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, अंडी आदींसह भाज्यांची देखील मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यात येत आहे. प्रामुख्याने सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून वाहतूक करण्यात येत आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहतूक केलेल्या नाशवंत मालापैकी तब्बल 1127.67 टन डाळींबांची वाहतूक केली आहे.