मुंबई: कोरोना बाधित महात्मा जोतिबा फुले आरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत अतिदक्षतेचा कोरोना बाधित रुग्ण असेल त्याचा संपूर्ण खर्च सरकार करणार. कोरोना पार्श्वभूमीवर आतापर्यंत जी लक्षण आढळलेली प्रवासी ९७१ होते. एकूण १०३६ प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर पंतप्रधान यांनी जे काल आव्हान केले आहे, रविवारी सेल्फ कर्फ्यु ची घोषणा करण्यात आली आहे त्याला जनतेने १००% प्रतिसाद दिला पाहिजे, या आजारातून मुक्त होण्यासाठी नागरीकांना गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. कोरोना पार्श्वभूमीवर आता आपण ६ लॅब मध्ये टेस्ट करत आहोत येणाऱ्या दिवसात ही संख्या १२ होईल.
22 मार्चला जनता कर्फ्यू : मोदी
राज्यात १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १०३६ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ९७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज ७८ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १३०५ प्रवाशांपैकी ४४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.