नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विवादित तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांना आपापल्या घरी जात एक नवी सुरुवात करण्याचे आवाहन करत या महिनाअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी सत्रामध्ये कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मात्र खुद्द पंतप्रधान मोदी यांनी शब्द दिल्यानंतर देखील शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीयेत. संसदेमध्ये या कायद्यांचे विसर्जन झाल्यानंतरच मागे हटू अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर खात्यावर पोस्ट केलेल्या एका संदेशात, ‘पंतप्रधानांचे खोटे ‘जुमले’ झेललेली जनता त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवायला तयार नाही.” अशी टीका केली आहे.
झूठे जुमले झेल चुकी जनता PM की बात पर विश्वास करने को तैयार नहीं!
किसान सत्याग्रह जारी है।#FarmersProtest continues.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 21, 2021
सोबतच राहुल गांधींना #FarmerProtest Continues असा हॅशटॅग देखील वापरला आहे. तत्पूर्वी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कृषी कायदे संसदेत मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार या शेतकरी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. तसेच कायदे मागे घेण्याचा निर्णय निवडणुकांपुरती छळवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रियंका गांधी यावेळी, “भाजप नेत्यांची निवडणुकांनंतर कृषी कायदे पार्ट आणू अशी विधाने शेतकऱ्यांच्या मनातील शंका खरी ठरवतात. भाजपने भूमी अधिग्रहण कायद्यावेळीही असाच छळ केला होता. शेतकऱ्यांना निवडणुकांपुरते कायदे मागे घेण्याची छळवणूक नको तर शेतकऱ्यांचे हक्क हिसकावणाऱ्या कायद्यांचा नायनाट हवा आहे.” असं म्हणाल्या.
भाजपा नेताओं के “चुनाव बाद कृषि कानूनों को वापस लाने” वाले बयान किसानों की आशंकाओं को सही ठहराते हैं। भाजपा ने भूमि अधिग्रहण कानून के मामले में भी यही छल किया था।
किसानों को चुनावों के समय कानून वापस लेने का छलावा नहीं, एमएसपी व फसल का हक लूटने वाले कानूनों का समूल नाश चाहिए pic.twitter.com/AdKddiBLmR
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 21, 2021