शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील धामारी गावामध्ये निसर्गाचा अद्भुत चमत्कार घडत असून तीन वर्षापूर्वी एका शेतकऱ्याने घेतलेल्या बोअरवेल मधून सध्या जास्त पाउस झाल्याने तब्बल तीस फुट उंचीवर पाणी उडत असल्याने निसर्गाचा अनोखा चमत्कार घडला असल्याचे बोलले जात आहे.
येथे अनेक ठिकाणचे नागरिक पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. सदर ठिकाणी कायम दुष्काळ असताना सध्या पाण्याबाबत असा प्रकार घडल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
दरम्यान, हा सर्व प्रकार पाहण्यासाठी लवकरच येथे काही भूजल तज्ञ भेट देणार आहेत.