रांजणगाव गणपती – दारू खरेदी करणारांना मोफत धान्य व इतर सुविधा देऊ नयेत. कारण जगण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, असे सिद्ध होते. अशी प्रतिक्रिया क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे.
अवघा भारत करोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांच्या खिशातून जगण्यासाठी उपलब्ध पैसा लुटण्यासाठी दारु दुकानांना दिलेली परवानगीचा निषेध आहे.
यामुळे महिला व मुलांचे मोठ्या प्रमाणात मानसिक, शारीरिक छळ होणार आहे. दारू दुकानासमोर असणारी गर्दी ही मोठ्या प्रमाणात तरुणांची दिसत आहे. शासनाने ताबडतोब निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संजय पाचंगे यांनी केली आहे.