नागपूर – वादग्रस्त कृषी विधेयकाच्या निषेधार्थ उत्तर भारतात निषेधाची जोरदार लाट उसळली आहे. काँग्रेसही या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झाली असून काल पंजाबमध्ये युवक कॉंग्रेसने दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर किसान आक्रोश मोर्चा काढला. ट्रॅक्टरची रॅली काढून केलेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
दरम्यान, काँग्रेसचे हे आंदोलन लबाडी असल्याचा आरोप करत राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी हे आरोप केले आहेत. ते म्हणतात, “या विधेयकांचं आश्वासन काँग्रेसनेच आधी दिलं होतं. आता तीच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत असल्याने काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे.”
राहुल गांधी यांच्यावरही निशाणा
राहुल गांधी कृषी विधेयकांवरून मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना फडणवीस यांनी, “राहुल गांधी यांनी लोकसभेच्या वेळी काँग्रेसचा जो जाहीरनामा होता तो वाचला नाही. कारण तो वाचला असता तर त्यांनी मोदी सरकारवर कृषि विधेयकांवरुन आरोप केलेच नसते.” असा टोला लगावला.