पुणे : माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या करोना काळातील कार्य अहवालाचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, उपमुख्यमंत्री पवार यांनी कदम यांच्या कामाचे कौतूक करत हे काम करताना आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन त्यांना दिले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष . जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ साहेब, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्रीधनंजय मुंडे , अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
तर या कदम यांनी केलेल्या कामाचे कौतूक करत कदम यांच्या मतदारसंघातील आरोग्य विषयक प्रश्नां संदर्भात पुण्यात आल्यानंतर भेट देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी कदम यांना दिले.