वाराणसी –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे स्वच्छ भारत मिशनच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आपल्या सरकारच्या महत्त्वकांक्षी पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ‘जेवढा मोठा केक तेवढा मोठा त्याचा वाटा’ याच म्हणीप्रमाणे अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सची बनवल्यानंतर या देशातील अर्थव्यवस्थेच्या वाटेकऱ्यांना अधिक लाभ होईल.”
PM Narendra Modi in Varanasi: Yesterday on TV&today in newspapers, you must have heard&read about the goal of $5 trillion economy. It is very important for you all to understand what $5 trillion economy means & how it is connected to every Indian citizen. #UnionBudget2019 pic.twitter.com/6xODREoTqr
— ANI UP (@ANINewsUP) July 6, 2019
तत्पूर्वी, मोदींनी संसदेत अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर मोदींनी दूरचित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या भाषणातून त्यांची भावना व्यक्त केली होती. देशाच्या 21 व्या शतकातील विकासाला चालना मिळेल. उद्योगांना आणि उद्योजकांना मजबुती मिळेल. देशाच्या विकासातील महिलांचा सहभाग वाढेल. अर्थसंकल्पामुळे करप्रक्रिया सुलभ होईल. असेही त्यांनी म्हटले.