नवी दिल्ली: आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्लीच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरु पराभव करत बाद फेरीत प्रवेश मिळवला. यावेळी दिल्लीने बंगळुरुवर 16 धावांनी मात करत तब्बल 7 वर्षांनी म्हणजेच 2012 नंतर प्रथमच ते प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरले. त्यामुळे संघाचा मेंटॉर असलेला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने संघातील खेळाडूंचा मला अभिमान वाटतो असे विधान केले आहे.
या संघाबाबत बोलताना दिल्ली कॅपिटल्सचा मेंटॉर सौरव गांगुली म्हणाला की आमच्या संघात अनुभवाचा अभाव अजिबात नाही. आमच्या संघात युवा खेळाडू आणि अनुभवी खेळाडू यांचे उत्तम मिश्रण आहे. शिखर धवन याच्यासारखा अनुभवी खेळाडू आमच्या संघात आहे. तो खेळताना त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास असल्याचे दिसून येते. त्याचा फॉर्म आमच्या संघासाठी अतिशय महत्वाचा होता.
सुदैवाने त्याने चांगली कामगिरी केली. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीने संघात फार बदल केले नाहीत. उलट त्यांनी आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वास सार्थ ठरवला. याच खेळाडूंमुळे दिल्लीला प्ले ऑफ्सचा टप्पा गाठता आला, असेही गांगुली म्हणाला.