मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात जे मतदान पार पडले त्यात इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनमधील तांत्रिक बिघाड व अन्य तत्सम तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या असून तशा स्वरूपाच्या सुमारे 50 तक्रारी कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोंगाकडे सादर केल्या आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काहीं ठिकाणी मतदान केंद्रांवर दादागिरी केल्याच्याही तक्रारी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
यापैकी अनेक तक्रारी नागपुर, चंद्रपुर, यवतमाळ या मतदार संघातून आल्या आहेत असे कॉंग्रेसच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी ही यंत्रे अगदी स्लो चालत होती, काही ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्थाच नव्हती तर काही ठिकाणी मतदान केंद्रांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केली असे कॉंग्रेसच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.या प्रकारांची योग्य ती दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणीही कॉंग्रेसच्या विधी सेलचे अध्यक्ष विजय पांडे यांनी आयोगाला सादर केलेल्या निवेदनात केली आहे.