ओल्या दुष्काळात सदस्य दौऱ्यावर
राज्यासह नगर जिल्ह्यात ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत आली आहे. अशावेळी त्यांना आधार देण्याचे काम करण्याऐवजी ते लोकप्रतिनिधी राज्याच्या सत्ता समिकरणात गुंतले असतांना खालीफळी म्हणून जिल्हा परिषद सदस्यांकडे पाहिले जाते. पण ते सदस्य आता दौऱ्यावर जात आहेत.
नगर – जानेवारीमध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडीला अजून दीड महिना बाकी असला तरी आतापासून अध्यक्षपदासाठी लागणार बहुमताचा जादुई आकडा गाठून सत्तेचा सोपान चढविण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. त्यातून तब्बल 31 सदस्यांसाठी विमाने ओडीसा सहलीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा स्वनिधीचा वापर केला जाणार आहे.
राज्यात सत्ता समिकरणे बदलल्याने जिल्ह्यातील त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेत नव्याने महाविकास आघाडीची सत्ता येणार की भाजपचा झेंडा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे यांच्या माध्यमातून रोवला जाणार हे आता महत्वाचे आहे. अर्थात विखे कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामुळे त्यांना अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस उमेदवारी देणार का हा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेपूर्वी जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलली होती. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याबरोबर भाजपमधून देखील काहींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने जिल्हा परिषदेच्या संख्याबळात बदल झाले आहे. अर्थात तांत्रिक दुष्ट्या हे सदस्य मुळ पक्षात आजही आहेत. मनाने मात्र ते नव्या पक्षात आले. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादी 19, भाजप 14, शिवसेना 7, शेतकरी क्रांतीकारी पक्ष 5, महाआघाडी 2, भाकप 1, जनशक्ती 1, अपक्ष 1 असे संख्याबळ होते.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलीच मुसंटी मारली. 12 जागापैकी सहा जागा मिळविल्या तर भाजपला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. त्यात राज्यात देखील सत्ता समिकरण बदलले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना – कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असे महाविकासआघाडी आता सत्तारुढ झाली आहे. त्यामुळे त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडीमुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसला अध्यक्षपद मिळून शकते. राष्ट्रवादीचे 19, कॉंग्रेसचे 23 व शिवसेना 7 तसेच शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे 5 असे समिकरण जुळू शकते. अर्थात कॉंग्रेसचे 23 सदस्य असले तरी विखे गटाला मानणारे 14 जण आहेत. त्यामुळे मुळ कॉंग्रेसचे 9 सदस्य राहिली. तरी महाशिवआघाडीचे सत्ता येवू शकते.
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जुळवाजुळवा सुरूवात झाली आहे. त्यातून तब्बल 31 सदस्य घेवून ओडीसा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या 3 ते 7 डिसेंबर असा चार दिवसांचा हा दौरा राहणार आहे. विमानाने हा दौरा होणार आहे. दि. 3 डिसेंबर पुणे विमानतळावरून ओडीसाच्या राजधानी भुवनेश्वर येथे जाणार आहे. दि. 4 डिसेंबर कोर्णाक सुर्यमंदिर, चंद्रभागा समुद्र किनार, जन्नानाथाचे मंदिर, येथील बाजारात फिरणार करून बुद्धाच्या शांती स्तुप पाहणी. दि. 5 डिसेंबरला कालिजाई बेटाला भेट, कालिजाई मंदिराला भेट, भेरामपूर, गंजम येथील जिल्हाधिकारी यांनी आयोजित कार्यक्रमाला उपस्थितीत.
दि. 6 डिसेंबर रोजी भुवनेश्वर येथून कोर्णाक व पुरी येथे जाणार आहे. कालाभूमी या संग्रहालयास भेट देणारे आहे. कंदगिरी व उदयगिरी या जैन गुफा पाहणार आहे. भुवनेश्वर येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम. दि. 7 डिसेंबरला लिंगराज मंदिर, मुक्तेश्वर मंदिराला भेट. या प्रमाणे या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्यात स्थायी समिती, जलव्यवस्थापन समिती, अर्थ व बांधकाम समितीचे सदस्य सहभागी होणार आहे. त्यात अध्यक्ष शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, अनुराधा नागवडे, संदेश कार्ले, अनिल कराळे, सुप्रिया पाटील, महेश सुर्यवंशी, हर्षदा काकडे, आशा दिघे, तेजश्री लंघे, सुनिल गडाख, प्रभावती ढाकणे, पुष्पा रोहम, सोनाली रोहमारे, रोहिणी निघुते, उज्ज्वला ठुबे, राहुल शिंदे, मोहन पालवे, काशिनाथ दाते, कोमल वाखारे, शरद नवले, राजेश परजणे, रामहरी कातोरे, शशिकला पाटील, सुधाकर दंडवते, शरद झोडगे, ताराबाई पंधरकर, कविता लहारे, वासुदेव सोळूंके, परिक्षित यादव, किशोर गीते, सुहास गोबरे, राजू जरे, किशोर शिंदे, दिनेश बर्डे, सविता अडसुरे, दत्तात्रय काळे, जालिंदर वाकचौरे.