नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात ज्यांनी साक्ष दिली, त्या सर्व साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पाऊले उचला, अशी सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकार व पोलिसांना केली आहे.
2018 सालच्या साक्षीदार संरक्षण योजनेतील सर्व तरतुदींनुसार या प्रकरणातील सर्व साक्षीदारांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असून, त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सुशीलने आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप वकील अजय कुमार आणि पल्लवी पिपानिया यांनी केला आहे. सुशीलचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असून, त्याच्याविरोधात जबानी देऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे माझ्या जिवाला धोका आहे, असेही पिपानिया यांनी सांगितले.