पुणे : कोयत्याने खून केल्याप्रकरणातून एकाची सबळ पुराव्या अभावी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.जे. देशपांडे याने निर्दोष मुक्तता केली. दारू पिणे आणि पैशावरून झालेल्या वादातून 28 डिसेंबर 2017 रोजी हि घटना घडली हाती.
उदयकुमार विश्वनाथ भगत (वय 25, रा. कोथरूड, मूळ. बिहार) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. हेमंत कांबळे आणि ऍड. हर्षवर्धन थोरात यांनी बाजू मांडली. सियाराम गोपी चौपाल (वय 21, रा. कोथरूड, मूळ. बिहार) असे खून झालेल्याचे नाव असून, त्याचा मावस भाऊ मनोज पलटू चौपाल (वय 24) असे याने कोथरूड पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोथरूड येथील एका ऑफीसमध्ये भगत आणि सियाराम एकत्र दारू पित बसले होते. त्यावेळी झालेल्या वादातून खून करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेच्या वेळी भगत याचे अंगावर असलेले कपडे जप्त करण्यात आले होते. त्यावर रक्ताचा डाग नाही. घटनेच्या ठिकाणी दोन कोयते मिळून आले आहेत.
एकाला मारहाण करण्यासाठी दोन कोयते कशाला लागतील, यावरून त्याला खोट्या गुन्ह्यात गुंतविल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षदर्शीही कोणी नाही. त्यामुळे त्याची मुक्तता करण्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे ऍड. हेमंत कांबळे आणि ऍड. हर्षवर्धन थोरात यांनी केला.