Girish Mahajan On Eknath Khadse| राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला आहे. मागील काही दिवसांपासून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच आता खडसे यांच्या सूनेला भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे यातून महाविकास आघाडी कोंडी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हते. त्यावेळी भाजपला मी जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले होते. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. गिरीश महाजन म्हणाले की, “एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये काम करत होते. हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन फिरताना मी त्यांना बघितले आहे. त्यांनी खूप दगडं खाल्ले, प्रतिकूल परिस्थितीत काम केले असं काही नाही. 1990 मध्ये विधानसभेचे त्यांना तिकीट मिळाले आणि ते निवडून आले. या गोष्टीचा मी साक्षीदार आहे.”
खडसेंचा हा स्वार्थीपणा
“सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात जास्त खाते त्यांना मिळाले. कोणता वाईट काळ त्यांनी बघितला आहे. तुम्ही पक्षप्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा निवडून आले हे तुम्ही विसरू नका. खडसेंचा हा स्वार्थीपणा आहे. त्यांनी कोणाला शिकवू नये. टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का?” असा सवाल देखील महाजन यांनी केला आहे. Girish Mahajan On Eknath Khadse|
“आम्हाला कुणाच्या आशीर्वादाची गरज नाही तुम्ही तुमच्या पक्षाचे काम करा. तिकडे किती मतं पडतात ते दाखवा. आता तुम्ही सांगितला आहे ना की मी राष्ट्रवादी शरद पवार गट आहे. तर तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा. तुमची किती ताकद आहे हे जिल्ह्याला दाखवा दोन्ही लोकसभा मतदारसंघात दाखवा. सोयीचे राजकारण करू नका, तशी भूमिका घेवू नका. फार काळ तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही,” असेही गिरीश महाजन म्हणाले. Girish Mahajan On Eknath Khadse|
भाजपमध्ये होता म्हणून तुमची किंमत होती
एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. त्यांची काय ताकद होती ते मला माहित आहे. पक्षासोबत होता म्हणून त्यांची ताकद होती पक्ष सोडला आता त्यांचं काय राहिले? त्यांच्या मुलीला ते त्यांच्या मतदारसंघातून निवडून आणू शकत नाही. पण माझ्यामुळे सर्व काही आहे हा समज त्यांचा आता दूर झाला असेल. भाजपमध्ये होता म्हणून तुमची किंमत होती आज तुम्ही बाजार सोडून गेला आज तुम्ही कुठेच राहिला नाहीत” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
हेही वाचा: